"बारा भावना"
अनित्य भावना -
हे समज मना विचार करुनि पाही , तव जिवलग कोणी नाही ।
तू सोड जीवा मात-पिता धन दारा , झणि भाव भावना बारा ।
इंद्रिय भोग क्षणभर हे । यौवन गोधन सुत सारे । सृष्टीचे वैभव सारे ।
जे दिसते ते अखेर बा जाणार , अनित्य भावना धार ।।१।।
अशरण भावना -
किती जगती या असंख्य असती जीव , धनवान रंक कुणी राव ।
यमराज जरी देते जीवा तुज भेट, करितो हा ताटातूट ।
तुम्ही मंत्र तंत्र जरी केले । शरण हि कुणाला गेले । पिंजऱ्यात जरी जाखडीयले ।
हे सोडूनी ( प्राण ) पक्षी उडुनी जाणार , अशरण भावना धार ।।२।।
संसार भावना -
चहुंगती माजी अपार असती जीव , भोगती दुःख सदैव ।
धनी धनावीन ,पुत्राविण जै माता , किती दुःखी पतीविन कांता ।
नश्वर सुख संसाराचे । हे वैभव संसाराचे । शेवटी सारे जायाचे ।
फसू नको जीवा दुःखमयी संसार । संसार भावना धार ।। ३ ।।
एकत्व भावना -
कुणी भोगितसे संपत्तीचे सौख्य ,कुणी भोगी अगणित दुःख ।
श्रम करुनि कुणा पोटभरी नाच अन्न , दिनरात भोगी कुणी चैन ।
वहिवाट हि संसाराची । सुख दु:खी रंक रावाची । भोगितो जीव एकाकी ।
सुखदुःखाचा भोगत तू असणार । एकत्व भावना धार ।।४।।
अन्यत्व भावना -
बा शरीरही आहे जेथ विभक्त , मग कसले सूत वा भ्रात ।
हे सर्व असे अन्यची आत्म्याहून , अन्यात्मा पदार्थाहून ।
जरी नीरक्षीर एकत्र । पुद् गल आत्मा एकत्र ।अनादी काल नान्यत्र ।
एकत्र सादा असुनी भिन्न असणार ।अन्यत्व भावना धार ।।५।।
अशुचि भावना -
सांपळा पाहा हाडांचा हा देह , घाण आंत नि:संदेह ।
नवद्वार सदा वाहातसे दिनरैन भुलू नकोस तू पाहून ।
पिंजरा हाड मांसाचा । चामडीने सजला साचा ।प्राणी हा भुलतो कैसा ।
या देहाचा नाश असे होणार, अशुचि भावना धार ।।६।।
आस्त्रव भावना -
मोह उदये भ्रमतो जीव अपार , नच पाही काही स्वपर ।
तू सावध हो शक्ती तुझी अनिवार ,कर्मा करी चक्काचूर ।
मानवाचकाय करून । जवं होते हलन चलन ।आत्मा हि हलतो जाण ।
या योगे बा आस्त्रव दुःख देणार , आस्त्रव भावना धार ।। ७।।
संवर भावना -
किती जीव भ्रमला आस्त्रव योगे करुनि , निज स्वात्महिता सोडून ।
नाशी अष्टकर्मा संवर योगे शूरा ,फिरू नकोस सैरा वैरा ।
तू शुभाशुभ भावाते । सोडूनि देई त्याते । झणि पाही स्वात्मतेजाते ।
संवर योगे उध्दरूनी जाणार , संवर भावना धार ।। ८।।
निर्जरा भावना -
जरी कर्म झडे अपुला समय पावून , नच होई स्वात्महित पूर्ण ।
तूं नष्ट करी तपद्वारे कर्माला , वरून घे चीर सौख्याला ।
तप साधन आत्मउन्नतीचे । जे प्राप्त करी सुख साचे । या विणे मोक्ष सुख कैसे ।
निर्जरा करीत शिव मिळणार , निर्जरा भावना धार ।।९।।
लोक भावना -
या पृथ्वीचा कर्ता कोणी नाही , हर्ता वा धरता नाही ।
हे भुलणाऱ्या सरागतामय जिवा ,सोड ,व्यर्थ करू नको हेवा ।
षट द्रव्यमयी हा लोक । नाश कधी नच होत । वायूने राही स्थित ।
दुख लोकी या समतेविण होणार , लोक भावना धार ।।१०।।
बोधिदुर्लभ भावना -
जरी गेला तू ग्रिवेयक पर्यंत , अहमिंद्र कितीदा होत ।
जर तुझं नाही झाले सम्यक ज्ञान, गोते खाई भव भव फिरून ।
सज्ज्ञान हे सम्यक ज्ञान ।यावीण चारित्र न पूर्ण ।मुनी करिती याचे ग्रहण ।
या ज्ञानाने भव फेरी चुकणार , हि बोधिदुर्लभ भावना धार ।।११।।
धर्म भावना -
सम्यक दर्शन ज्ञान चरित तपरत्न , मोहभाव याहून भिन्न ।
या भावाने सौख्य मिळे आमरण , तू जाशील हा भव तरून ।
धर्म यास म्हणती सर्व । श्रावकास हाचि धर्म । याविणें व्यर्थ षट्कर्म ।
येने अचल सौख्य मिळणार , ही धर्म भावना धार ।।१२।।
अनित्य भावना -
हे समज मना विचार करुनि पाही , तव जिवलग कोणी नाही ।
तू सोड जीवा मात-पिता धन दारा , झणि भाव भावना बारा ।
इंद्रिय भोग क्षणभर हे । यौवन गोधन सुत सारे । सृष्टीचे वैभव सारे ।
जे दिसते ते अखेर बा जाणार , अनित्य भावना धार ।।१।।
अशरण भावना -
किती जगती या असंख्य असती जीव , धनवान रंक कुणी राव ।
यमराज जरी देते जीवा तुज भेट, करितो हा ताटातूट ।
तुम्ही मंत्र तंत्र जरी केले । शरण हि कुणाला गेले । पिंजऱ्यात जरी जाखडीयले ।
हे सोडूनी ( प्राण ) पक्षी उडुनी जाणार , अशरण भावना धार ।।२।।
संसार भावना -
चहुंगती माजी अपार असती जीव , भोगती दुःख सदैव ।
धनी धनावीन ,पुत्राविण जै माता , किती दुःखी पतीविन कांता ।
नश्वर सुख संसाराचे । हे वैभव संसाराचे । शेवटी सारे जायाचे ।
फसू नको जीवा दुःखमयी संसार । संसार भावना धार ।। ३ ।।
एकत्व भावना -
कुणी भोगितसे संपत्तीचे सौख्य ,कुणी भोगी अगणित दुःख ।
श्रम करुनि कुणा पोटभरी नाच अन्न , दिनरात भोगी कुणी चैन ।
वहिवाट हि संसाराची । सुख दु:खी रंक रावाची । भोगितो जीव एकाकी ।
सुखदुःखाचा भोगत तू असणार । एकत्व भावना धार ।।४।।
अन्यत्व भावना -
बा शरीरही आहे जेथ विभक्त , मग कसले सूत वा भ्रात ।
हे सर्व असे अन्यची आत्म्याहून , अन्यात्मा पदार्थाहून ।
जरी नीरक्षीर एकत्र । पुद् गल आत्मा एकत्र ।अनादी काल नान्यत्र ।
एकत्र सादा असुनी भिन्न असणार ।अन्यत्व भावना धार ।।५।।
अशुचि भावना -
सांपळा पाहा हाडांचा हा देह , घाण आंत नि:संदेह ।
नवद्वार सदा वाहातसे दिनरैन भुलू नकोस तू पाहून ।
पिंजरा हाड मांसाचा । चामडीने सजला साचा ।प्राणी हा भुलतो कैसा ।
या देहाचा नाश असे होणार, अशुचि भावना धार ।।६।।
आस्त्रव भावना -
मोह उदये भ्रमतो जीव अपार , नच पाही काही स्वपर ।
तू सावध हो शक्ती तुझी अनिवार ,कर्मा करी चक्काचूर ।
मानवाचकाय करून । जवं होते हलन चलन ।आत्मा हि हलतो जाण ।
या योगे बा आस्त्रव दुःख देणार , आस्त्रव भावना धार ।। ७।।
संवर भावना -
किती जीव भ्रमला आस्त्रव योगे करुनि , निज स्वात्महिता सोडून ।
नाशी अष्टकर्मा संवर योगे शूरा ,फिरू नकोस सैरा वैरा ।
तू शुभाशुभ भावाते । सोडूनि देई त्याते । झणि पाही स्वात्मतेजाते ।
संवर योगे उध्दरूनी जाणार , संवर भावना धार ।। ८।।
निर्जरा भावना -
जरी कर्म झडे अपुला समय पावून , नच होई स्वात्महित पूर्ण ।
तूं नष्ट करी तपद्वारे कर्माला , वरून घे चीर सौख्याला ।
तप साधन आत्मउन्नतीचे । जे प्राप्त करी सुख साचे । या विणे मोक्ष सुख कैसे ।
निर्जरा करीत शिव मिळणार , निर्जरा भावना धार ।।९।।
लोक भावना -
या पृथ्वीचा कर्ता कोणी नाही , हर्ता वा धरता नाही ।
हे भुलणाऱ्या सरागतामय जिवा ,सोड ,व्यर्थ करू नको हेवा ।
षट द्रव्यमयी हा लोक । नाश कधी नच होत । वायूने राही स्थित ।
दुख लोकी या समतेविण होणार , लोक भावना धार ।।१०।।
बोधिदुर्लभ भावना -
जरी गेला तू ग्रिवेयक पर्यंत , अहमिंद्र कितीदा होत ।
जर तुझं नाही झाले सम्यक ज्ञान, गोते खाई भव भव फिरून ।
सज्ज्ञान हे सम्यक ज्ञान ।यावीण चारित्र न पूर्ण ।मुनी करिती याचे ग्रहण ।
या ज्ञानाने भव फेरी चुकणार , हि बोधिदुर्लभ भावना धार ।।११।।
धर्म भावना -
सम्यक दर्शन ज्ञान चरित तपरत्न , मोहभाव याहून भिन्न ।
या भावाने सौख्य मिळे आमरण , तू जाशील हा भव तरून ।
धर्म यास म्हणती सर्व । श्रावकास हाचि धर्म । याविणें व्यर्थ षट्कर्म ।
येने अचल सौख्य मिळणार , ही धर्म भावना धार ।।१२।।